पोस्ट्स

बारवी धरण अंबरनाथ/बदलापूर - Barvi Dam (Ambarnath/Badlapur)

     पाऊस पडायला लागला की सर्वांना मस्त पाण्यात डुंबायला, भिजायला आवडते. मग सुरु होते पावसाळी सहलीची लगबग, कुठे जायचे कसे जायचे याची चर्चा. म्हणुनच आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मुंबईजवळील बारवी नदीवर बांधलेल्या बारवी धरणाच्या परिसराची माहिती.      तर बारवी धरणाला भेट देण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक आहेत ती मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर स्थानके. त्यामुळे लोकल ने जायचे झाल्यास सकाळी लवकरच प्रवास केलेला बरा. नाहीतर स्वत:चे वाहन असल्यास सकाळी लवकर रस्तेमार्गे जाणे योग्य कारण उशीरा निघाल्यास रस्तेमार्गे जाताना वाहतुकीत वेळेचा खोळंबा होण्याची शक्यता असते.      अंबरनाथ किंवा बदलापूरवरून बारवी धरणाकडे दोन्ही बाजूने हिरवीगार झाडीतून जाणारा नागमोडी रस्ता पार करीत जेव्हा धरणाजवळ पोहोचतो त्यावेळी बारवी धरणाचा काठोकाठ भरलेला जलाशय आणि तिथले नयनरम्य निसर्ग पाहिल्यावर प्रवासात जाणवलेला थकवा कुठल्याकुठे पळून जाईल व एकदम मोकळ्या हवेत ताजेतवाने झाल्यासारखे वाटेल.      हा परिसर जंगलाने वेठलेला असल्यामुळे रस्त्याने येताना काही जंगली पशुपक्षी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका व घाबरुन त्यांना कोणती ई

Nivant - Journey Towards Relaxation

इमेज
                  प्रिय  वाचकांस  असे  नमुद करावयाचे  आहे की.  मी  सुदेश  रा.  धोत्रे भ्रमंती कट्टाचा  सर्वोसर्वा. माझे  स्वत:चे   एक  नवीन  ध्यानधारणा  करण्यासाठी   (Meditation)   तसेच  तणावमुक्त   (Stress  Relief)   राहण्यासाठी    Nivant - Journey Towards Relaxation  हे सांगितीक युट्युब चॅनल सुरु केले आहे. तरी आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला अवश्य भेट द्या व सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र परिवारास शेअर करा.        जेणेकरुन माझे मनोबल वाढण्यास मदत होईल व मला न नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. चॅनलला भेट देण्यासाठी पुढील युट्युबच्या चिन्हावर   क्लिक करा. धन्यवाद...

सज्जनगड (सातारा) - Sajjangadh (Satara)

        सज्जनगड  म्हटले  की  सर्वप्रथम  डोळ्यासमोर  येतात  ते  समर्थ  रामदास  स्वामी.  कारणही  तसे  आहे  म्हणा, निजामाकडून मराठ्‍यांनी हा जिंकून घेतला व  शिवाजी  महाराजांनी   * (यावेळी  शिवाजी  महाराजांचा  राज्याभिषेक झाल्या  नसल्याकारणाने  येथे  शिवाजी  महाराज  असा  उल्लेख  केला  आहे.)  समर्थ  रामदास   स्वामींना   गडावर कायमच्या  वास्तव्यासाठी  विनंती  केल्यामुळे  ते  कायमचे  वास्तव्यास  आले  व  या  गडाचे  नाव  नौरससातारा  चे सज्जनगड असे झाले ते आजता गायत.        तर हा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सज्जनगडाची आज आपण माहिती घेणार आहोत.       सज्जनगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्‍यातील कारी, परळी, गजवाडी या गावांनी वेढलेला आहे. अती प्रचीनकाळी याठिकाणी आश्वलायन ॠषी वास्तव्यास होते म्हणून तेव्हा आश्वलायनगड असे म्हणत असत. येथे ११ शतकात शिलाहार राजा भोज यांनी किल्ल्याची उभारणी केली. साधारत: १३५८ ते १३७५ च्या दरम्यान चवथा बगमनी राजा महंमदशहा याच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. कालांतराने वारसाहक्‍काने हा कि

वंडर्स पार्क - Wonders Park

     वंडर्स पार्क हे नवी मुंबईतील एक अविस्मरणीय आनंद देणारे उद्यान आहे. हे उद्यान साधारणतः ३० एकर जागेवर वसवलेले आहे. या पार्कमध्ये जाण्यासाठी किमान प्रवेश शुल्क आकारले जाते.        वंडर्स पार्कमध्ये प्रवेश केल्याकेल्या एका उंचावलेल्या हातातील क्युब आपले लक्ष वेधून घेते आणि आपला एका छान दिवसाला सुरुवात होते. या पार्कमध्ये विविध आकाराचे प्रकाराचे बाक आणि विविध झाडांनी सुसज्ज अशी बाग आहे ज्यात मुले निवांतपणे खेळू शकतात. तसेच मुलांना खेळण्यासाठी येथे घसगुंडीचे विविध प्रकार तसेच झोपाळे, इतर साहसी खेळ देखील आहेत तेथे पडल्यावर मुलांना इजा होऊ नये म्हणून खाली रबराच्या मॅटची फ्लोरिंग केलेली आहे. इतर जॉय राईड्स, संपूर्ण वंडर पार्कला फेरी मारणारी टॉय ट्रेन देखील आहेत, त्यांची प्रवेशिका मुख्य प्रवेशिका घेतानाच घेणे बंधनकारक आहे, कारण पार्कमध्ये तशी सुविधा नाही आहे.        या वंडर्स पार्कचे मुख्य आकर्षण यात आग्रा येथील ताजमहाल, चीनची प्रसिद्ध ग्रेट वॉल, रिओ दि जानेरो येथील क्रिस्टो रेडेन्टर, जॉर्डन येथील पेट्रा - अल खजनेह, पेरू येथील माचू पिचू, मॅक्सिको येथील चिचेन इझा आणि इटलीतील कोलोशियम ही जगात

जुहू गार्डन - Juhu Garden

     जुहू गार्डन म्हटले की सर्वांना लहानपणाची आठवण आल्या शिवाय राहणार नाही. कारण त्याकाळी मुंबईत गार्डनही मोचकीच होती त्यात या गार्डनमध्ये असलेल्या एका विशिष्ट कारणामुळे हे गार्डन खुप प्रसिद्ध होते. आणि ते कारण म्हणजे या गार्डनमध्ये एक सिमेंटचे काँक्रिटचे बनवलेले विमान. हे गार्डन साधारणपणे ५० वर्षे जुने आहे. ते बृहन मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारित येते. सध्या हे गार्डन लायन्स जुहू म्युनिसिपल पार्क या नावाने ओळखले जाते.       ज्याकाळात सामान्य व्यक्तीला विमान पाहणे आणि विमानात बसणे दुरापास्त होते त्याकाळात अबालवृद्धांचे विमानात बसण्याची हौस मौज पुरवणारे ठिकाण म्हणजेच हे जुहूचे गार्डन. तसे पाहिले तर जुहू समुद्र किनारी फिरायला जाणारे आवर्जून ह्या गार्डनला भेट देतात.       तर हे विमान १९६० च्या दशकात एअर इंडिया या विमान सेवा पुरवणार्‍या कंपनीने बोईंग ७०७-४३६ या बनावटीच्या विमानाची सिमेंट काँक्रिटचे प्रतिरुप या गार्डनसाठी मुंबई महानगर पालिकेला भेट दिली आहे असे कळते. मध्यंतरी या विमानाचे काही अवशेष कोसळल्यामुळे अपघात झाला होता त्यामुळे हे गार्डन काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते. पण आता

गांधारपाले लेणी, महाड - Gandharpale Caves, Mahad

   मुंबई गोवा मार्गावरील प्राचीन काळापासून एक महत्वाचे व्यापारी ठिकाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केलेल्या चवदार तळ्यामुळे प्रसिद्ध असलेले महाड. महाड परिसरात येताच बाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगात लांबून दिसणारी लेणी आपल्याला खुणावत असते तीच गांधारपाले बौद्ध लेणी.       तर मग आज आपण या गांधारपाले बौद्ध लेण्याविषयी माहिती जाणून घेऊ या.       या परिसरातून गांधारी नदी वाहते, व लेण्याजवळ असलेल्या शिलालेखानुसार या प्रांतावर इ. स. १३० च्या दरम्यान बौद्ध धर्मीय कंभोज वंशिय राजा विष्णु पुलित यांचे राज्य होते असे समजते, या पुलित राजाच्या नावावरूनच पुढे या गावाचे नाव पाले झाले असावे, कालांतराने गांधार नदी जवळील प्रदेश असल्यामुळे पाले हे गाव गांधारपाले या नावाने ओळखले जाऊ लागले. तर राजा विष्णु पुलित यांच्या कालखंडात ही तीन मजली बौद्ध लेणी २८-३० छोट्‍या मोठ्‍या लेण्यांच्या समुहात हीनयान पद्धतीने कोरलेली आहे. या लेण्यांमध्ये ३ बौद्ध स्तुप, साधारण १५ पाण्याची टाकं आणि ब्राम्ही भाषेतील ३ शिलालेख आहेत.       त्यातील मुख्य लेणी जी १ क्रमांकाने ओळखल्या जाणार्‍या लेणीच्या प्रथम द

रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri

     भारतात जागोजागी डोंगरात कोरलेल्या लेण्या दिसतात. त्यापैकी एक खेड रत्नागिरी मध्ये असलेल्या बौद्ध लेणीसंबंधी आज आपण माहिती घेऊया.        रत्नागिरीचे खेड एक गजबजलेले ठिकाण आहे. तर याच गजबजलेल्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर एक बौद्ध लेणी आहे. ही लेणी खेडची बौद्धलेणी म्हणूनच प्रसिद्ध आहे.        या लेणीमध्ये एक चैत्य विहार आहे तसेच भिखुंना साधना करण्यासाठी तसेच राहण्यासाठी तीन खोल्याही आहेत. कालांतराने खेड ते दापोली, हर्णे बंदर हा व्यापारी मार्ग असल्यामुळे येथे व्यापारीवर्ग तसेच प्रवासी आराम करण्यासाठीसुद्धा या लेणीचा वापर करत असावेत.        ही लेणी जास्तकाळ दुर्लक्षित राहील्यामुळे लेणीची सविस्तर माहिती मिळणे अवघड आहे.        परिसरात कोणताही कचरा तसेच कोणत्याही प्रकारचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या व आपला अमुल्य वेळ आनंदी करावा.        सदर माहिती ही इंटरनेटच्या माध्यमातून संकलित केलेली आहे.        वरील माहिती कशी वाटली त्याबद्दल अभिप्राय आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून जरुर कळवा. माहिती आवडल्यास सामायिक (शेअर) करा आणि सभासद व्हा (सबस्क्राईब करा).   जवळील ठिकाणे :  सुक्या मासळींसाठी