सज्जनगड (सातारा) - Sajjangadh (Satara)
सज्जनगड म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात ते समर्थ रामदास स्वामी. कारणही तसे आहे म्हणा, निजामाकडून मराठ्यांनी हा जिंकून घेतला व शिवाजी महाराजांनी * (यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्या नसल्याकारणाने येथे शिवाजी महाराज असा उल्लेख केला आहे.) समर्थ रामदास स्वामींना गडावर कायमच्या वास्तव्यासाठी विनंती केल्यामुळे ते कायमचे वास्तव्यास आले व या गडाचे नाव नौरससातारा चे सज्जनगड असे झाले ते आजता गायत. तर हा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सज्जनगडाची आज आपण माहिती घेणार आहोत. सज्जनगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कारी, परळी, गजवाडी या गावांनी वेढलेला आहे. ...