पोस्ट्स

Ratnagiri लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri

     भारतात जागोजागी डोंगरात कोरलेल्या लेण्या दिसतात. त्यापैकी एक खेड रत्नागिरी मध्ये असलेल्या बौद्ध लेणीसंबंधी आज आपण माहिती घेऊया.        रत्नागिरीचे खेड एक गजबजलेले ठिकाण आहे. तर याच गजबजलेल्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर एक बौद्ध लेणी आहे. ही लेणी खेडची बौद्धलेणी म्हणूनच प्रसिद्ध आहे.        या लेणीमध्ये एक चैत्य विहार आहे तसेच भिखुंना साधना करण्यासाठी तसेच राहण्यासाठी तीन खोल्याही आहेत. कालांतराने खेड ते दापोली, हर्णे बंदर हा व्यापारी मार्ग असल्यामुळे येथे व्यापारीवर्ग तसेच प्रवासी आराम करण्यासाठीसुद्धा या लेणीचा वापर करत असावेत.        ही लेणी जास्तकाळ दुर्लक्षित राहील्यामुळे लेणीची सविस्तर माहिती मिळणे अवघड आहे.        परिसरात कोणताही कचरा तसेच कोणत्याही प्रकारचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या व आपला अमुल्य वेळ आनंदी करावा.        सदर माहिती ही इंटरनेटच्या माध्यमातून संकलित केलेली आहे.        वरील माहिती कशी वाटली त्याबद्दल अभिप्राय आपण कमें...

वेलास समुद्रकिनारा, रत्‍नागिरी - Velas Beach, Ratnagiri

     ऑलिव्ह रिडली जातीच्या कासवांसाठी प्रसिध्द असलेले अंतरराष्ट्रीय ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील वेलास हे गाव आणि ह्या गावचा वेलास समुद्रकिनारा.       पूर्वेला डोंगराने वेढलेला आणि पश्चिमेला अथांग असा निळाशार समुद्र अशा निसर्गसौंदर्याने नटलेला समुद्रकिनारा म्हणजे वेलास. वेलास गावचा इतिहास म्हणजे नाना फडणवीस यांचे हे जन्मगाव. एवढीच माहिती अनेकांना वेलास गावाबद्दल माहित असावी त्यामुळे दुर्लक्षीत असलेले हे गाव. पण हे गाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाऊ लागले आहे ते ऑलिव्ह रिडली प्रजातीच्या कासवांमुळे. या ऑलिव्ह रिडली प्रजातीची कासवे त्यांच्या विणीच्या (प्रजनन काळ) हंगामात या वेलासच्या सुरक्षित समुद्रकिनारी त्यांची असंख्य अंडी देतात व मार्च अखेरपर्यंत त्या अंड्‍यातून निघणारी पिल्ले त्याच्या मुक्‍कामी म्हणजे समुद्रात परतात.         गावातील मंडळी या कासवांच्या अंड्‍यांचे चांगल्याप्रकारे संगोपन करतात. तसेच गावातीलच सह्याद्री निसर्ग मित्र संघटनेचे स्वयंसेवक सकाळपासूनच समुद्रकिनारी फिरायला आलेल्या पर्यटकांना कासवांब...

थिबा राजवाडा - Thiba Palace

     इ. स. १८८५ सालापासून रत्‍नागिरी आणि ब्रम्हदेश म्हणजे सद्ध्याचा म्यानमार देशाबरोबर भावनिक नाते जुळलेले आहे ते थिबा राजामुळे.      १८८५ साली ब्रिटिशांनी ब्रम्हदेशावर कब्जा करत सात वर्षे राज्य करणार्‍या थिबा राजा आणि परिवाराला बंदी केले. ब्रम्हदेशावर राज्य करणारा शेवटचा राजा म्हणजेच राजा थिबा. राजाने पुन्हा उठाव करु नये म्हणून बंदी केलेल्या राज परिवाराला तत्कालिन मद्रास मार्गे रत्‍नागिरीला आणले व येथे स्थानबध्द केले. पण राज परिवाराला जेथे उतरवण्यात आले होते तेथे राज परिवाराला साजेशा सुविधा पुरविता येत नव्हत्या म्हणून १९१० साली सुमारे २७ एकराच्या प्रशस्थ जागेवर सर्व सोयींनी सुसज्‍ज असा तीन मजली राजवाडा बांधला. आणि थिबा राजाच्या राजपरिवाराला मग या राजवाड्‍यात नजरकैद करून ठेवले. थिबा राजाचा आपल्या मायभूमी, प्रजेपासून दूर जवळ जवळ ३० वर्षाच्या नजरकैदेत वयाच्या ५८ व्या वर्षी १९१९ साली मृत्यू झाला. अशा या राजाच्या या राजवाड्‍यातील वास्तव्यामूळे हा राजवाडा "थिबा राजवाडा" म्हणून प्रसिध्द झाला.        राजाला वेगवेगळ्या कलांचे शौक असल्यामुळे राजव...