पोस्ट्स

Beach Near Mumbai लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वेलास समुद्रकिनारा, रत्‍नागिरी - Velas Beach, Ratnagiri

     ऑलिव्ह रिडली जातीच्या कासवांसाठी प्रसिध्द असलेले अंतरराष्ट्रीय ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील वेलास हे गाव आणि ह्या गावचा वेलास समुद्रकिनारा.       पूर्वेला डोंगराने वेढलेला आणि पश्चिमेला अथांग असा निळाशार समुद्र अशा निसर्गसौंदर्याने नटलेला समुद्रकिनारा म्हणजे वेलास. वेलास गावचा इतिहास म्हणजे नाना फडणवीस यांचे हे जन्मगाव. एवढीच माहिती अनेकांना वेलास गावाबद्दल माहित असावी त्यामुळे दुर्लक्षीत असलेले हे गाव. पण हे गाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाऊ लागले आहे ते ऑलिव्ह रिडली प्रजातीच्या कासवांमुळे. या ऑलिव्ह रिडली प्रजातीची कासवे त्यांच्या विणीच्या (प्रजनन काळ) हंगामात या वेलासच्या सुरक्षित समुद्रकिनारी त्यांची असंख्य अंडी देतात व मार्च अखेरपर्यंत त्या अंड्‍यातून निघणारी पिल्ले त्याच्या मुक्‍कामी म्हणजे समुद्रात परतात.         गावातील मंडळी या कासवांच्या अंड्‍यांचे चांगल्याप्रकारे संगोपन करतात. तसेच गावातीलच सह्याद्री निसर्ग मित्र संघटनेचे स्वयंसेवक सकाळपासूनच समुद्रकिनारी फिरायला आलेल्या पर्यटकांना कासवांब...

चौल रेवदंडा - Chaul Revdanda

     आज आपण पोर्तुगिजांनी बांधलेल्या किल्ल्याविषयी माहिती घेऊया. तर कुंडलिका नदीचा आणि अरबी समुद्राचा संगम होतो असे ठिकाण म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालूक्यातील रेवदंडा गाव. या रेवदंडा गावातून जंजिर्‍याच्या सिद्धीच्या आणि मुंबईकर इंग्रजाच्या सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगिज कॅप्टन सोज याने १५२८ साली किल्ला बांधावयास सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी १५२१ ते १५२४ सालादरम्यान रेवदंडा गावाभोवती तटबंदी बांधून घेतली. या रेवदंडा गडावर तीन राज्यकर्त्यांनी राज्य केले एक अर्थातच पोर्तुगिज दुसरे मराठे आणि तिसरे इंग्रज. तर हा झाला रेवदंडा किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास.        किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच पोर्तुगिजांचे राजचिन्ह कोरलेले दिसते. हा किल्ला संवर्धनासाठी पुरातत्व खात्याकडे असला तरी काही ठिकाणी किल्ल्यावर खाजगी मालकी हक्‍क असल्याचे समजून येते त्यामुळे संपूर्ण किल्ला पहावयास मिळत नाही. किल्ला आणि भोवतालची तटबंदी बर्‍याच ठिकाणी ढासळलेल्या अवस्थेत आहेत.        किल्ला पाहून झाल्यानंतर पश्चिमेस असलेला नितांत सुंदर नारळी पोफळीच...

उत्तन समुद्र किनारा आणि माता वेलंकणी चर्च - Uttan Beach & Mother Velankanni Church

     महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर महानगर पलिकेच्या हद्दीत असणारे आणि मुंबईच्या उत्तर समुद्री किनार्‍यावर वसलेले उत्तन हे गाव. उत्तनला शांत आणि विरळ असलेली वस्ती व त्यांच्या घरांची ठेवण बघून लोक मिनी गोवा सुद्धा म्हणतात.      उत्तनला लाभलेला सुंदर असा समुद्री किनारा म्हणून इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा मासेमारी असल्यामुळे येथील शनिवार आणि रविवारी भरणारा मासळी बाजार ताज्या माश्यांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून बहूतेक मुंबईकर शनिवार, रविवारच्या सुट्टीचा आनंद आणि ताज्या मासळीचा आस्वाद घेण्यासाठी उत्तनला जरुर भेट देतात.      उत्तनचा सागरी किनारा हा नारळ, फोफळीच्या झाडांनी बहरलेला आहे. तसा हा दुरलक्षित सागरी किनारा असल्यामुळे इथे निवांत समुद्र किनारी फेरफटका मारत, मजामस्ती करत सहज दिवस निघून जातो.      येथे जास्तकरुन ख्रिच्छन कोळी समाज असल्यामुळे भाटे बंदरात असलेले माता वेलंकणी चर्च प्रसिद्ध आहे. मुख्यकरून येथे २९ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर या कालावधील वार्षिक जत्रा भरते, त्यावेळी या माता वेलंकणी चर्चला देश परदेशातून लाखो भावि...